सिद्धटेक,ता.१०: 'कष्टाशिवाय फळ नाही',या वडीलांनी दिलेल्या कानमंत्राचाच आधार घेत काबाडकष्ट करीत असलेल्या 'करण-अर्जुन' या भावंडांना, शिक्षणाने परिस्थितीवर सहज मात करता येऊ शकते, हे विचार कदाचित शिवलेच नसावेत. त्यामुळेच ऊसतोडणी कामगार असलेल्या आई-वडिलांना मदत म्हणून कुटुंबाच्या हालाखीच्या आर्थिक परिस्थितीवर कोयत्याने सपासप 'वार' करीत ते पुढे चालले आहेत. पुढे काय होणार...? याची जराही चिंता या दोघांना नसली, तरी या अवस्थेत त्यांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची व आर्थिक पाठींब्याचीसुद्धा...!!
सचिन गुरव