Surprise Me!

..तर केंद्राकडे हात पसरण्याची वेळच येणार नाही - उद्धव ठाकरे

2021-06-12 0 Dailymotion

अक्कलकोट : राज्याला केंद्राकडे हात पसरण्याची वेळ आली आहे असे विरोधक म्हणतात. मात्र, केंद्राने राज्याचे देणे वेळेवर दिले तर आम्हाला केंद्राकडे मागण्याची वेळच येणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले. राज्य सरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. राज्यभरात झालेल्या पावसानंतर अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. आज मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.