सिंधुदुर्ग : ''रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर रायगड मध्ये जो गुन्हा दाखल झाला त्यात त्यांनी आत्महत्या करायला प्रवृत्त केले असा आरोप आहे. ही केस बंद झाली होती. त्यामुळे सुडाने व आकसाने उद्धव ठाकरे सरकारने जे उद्योग सुरु केले आहेत, त्यातलाच गोस्वामी यांना अटक करणे हा उद्योग आहे,'' असा आरोप माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केला आहे.