वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कॉर्पोरेट कार्यालयावर आज अखिल भारतीस किसान संघर्ष समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू निघाले होते. पण पोलिसांनी त्यांना नागपुरातच अडवले. यावेळी बच्चू कडू म्हणाले, सकाळी विमानतळावर जाण्यासाठी बाहेर निघालो असताना पोलिसांना आम्हाला थांबवले आणि आपल्याला येथून जाऊ न देण्याचे आदेश आहेत, असे सांगितले. माझे विमान सकाळी ९.११ वाजताचे होते, ते हूकले. मी आता फोनवरून माहिती घेत आहे, की थांबवण्याचे कारण काय?